Friday, December 16, 2011

किती दिवस झालेत..........


खरतर गंमत असते, छानशा हवेत घराबाहेर पडावे कोणत्याच कारणाशिवाय. वाट फुटेल तसं चालत राहावं, कंटाळा आला की परतीची वाट धरावी. वाटेत एखादं देऊळ असावं, डोळे भरून मूर्तीकडे पाहावं, शांतपणे तिथे २ क्षण विसावा घ्यावा, किती दिवस झालेत पर्वतीवर नाही गेले, अनेकदा सारसबागेसमोरून जाते पण थांबून गणपतीचं दर्शन घ्यावं हे राहूनच जाताय.
किती दिवस झालेत, लक्ष्मी रोड किंवा एम जी रोड वरुन विंडो शॉपिंग करत भटकले नाही. कितीतरी दिवस झालेत घरी टेरेस मधे निवांत बसून चहा चा आस्वाद नाही घेतलाय, अनेकविध पदार्थांची चव या ना त्या कारणानी चाखत असते पण कितीतरी दिवस झालेत, तव्यावरची गरम पोळी आणि शिकरण मात्र विसरले आहे
किती तरी दिवस झाले काही कारण नसताना, मामा, आत्या, काका-काकू यांच्याकडे गेले नाही. की उगाचच कोणा मित्र-मैत्रीणीला फोन नाही केला. अनेकदा जी-टॉक किंवा एफ-बी वर अनेक जण ऑनलाइन दिसतात, पण गप्पा तिथेही होत नाहीत. माणसं आपल्या माणसांपासून तुटत जातात की स्वत:पासूनच?

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!