Tuesday, October 11, 2011

भविष्यात डोकावताना

परवा एक सुरेख मैफल रंगली होती गप्पांची! अचानक आमची गाडी मुलांच्या शाळा आणि त्यापायी मोजावे लागणारे लाखो रुपये यावर घसरली. मी या मताची होते की वय वर्ष ३ असताना तुम्ही अशा रीतीने खर्च करता त्यांच्यावर तेंव्हा आपोआप तुम्ही तुमच्या अपेक्षा त्यांच्यावर लादू लागता, प्रत्येक गोष्ट सहजगत्या त्यांच्या हाती देऊन, काही मिळवल्याचे सुख त्याना कधी गवसत नाही. या ओघात मी असं म्हणाले की काही वर्षानंतरची परिस्थिती मला खूप भीषण भासते आहे. पण म्हणजे नक्की काय?


याच आमच्या ग्रूप मधे एक जोडपे आहे, काही वर्षांपूर्वी लग्न झाले, आईवडिलानी घरदार बांधून ठेवलेले, हे दोघे दोन वेगवेगळ्या सेक्टर मधले, ती आय टी वाली..... गेल्या दोन वर्षात त्यानी दोन घरे विकत घेतली....गुंतवणूक म्हणून. मी अशी तर समाजवादी कधी नव्हते, पण या एका बाबतीत मला तो भावतो. काय आयुष्य करून घेतलाय आपण....नोकरी मिळताच पहिला विचार सुरू होतो तो घराचा. आई बापाने सोय केलेली असली तरी. मग लग्न होतं कमवती बायको येते, १५ वर्षांसाठीचं लोन ७/८ वर्षात संपून जातं, मग आपण म्हणतो आता मी मॅझया मुलासाठी पण एका घराची सोय करू पाहतो, तो पर्यंत आई बापाचं घर ही रिकामं झालेलं असतं, तरी आपण घराचाच विचार करतो.


मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला तर किमती वाढतात या अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे सदैव गगनाला जागांच्या किमती. आणि घर या गोष्टीकडे गुंतवणूक म्हणून पाहणारे आपण. काही काळानंतर गरीब आणि श्रीमंत यातील ही दरी इतकी वाढलेली असेल की श्रीमंत किंवा आपण तथाकथित मध्यमवर्गीय माणसाना आपणच कमावलेली संपत्ती संभाळताना नाकी नाउ येतील.


त्या एका गरीबाला विचारा काय कष्ट आहेत, एक वन रूम किचन चे स्वप्न बघून ते साकारताना. कुठे तरी हे कष्ट करून कमवायची लिमिट संपेल, आणि त्याचा उद्रेक होईल....."पा" मधील दृष्य आठवा, सारे गरीब संपादकाच्या घरात घुसलेले. काही वर्षांनंतर अशी परिस्थिती खरोखर उद्भवली तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही मला.


हाच पैसा आपण काही वेगळ्या सेक्टर मधे नाही का गुन्तवू शकणार? जर खरोखर आपल्याकडे गरजेपेक्षा खूप जास्त पैसा असेल तर दोघांपैकी कोणी एक फक्त मुलांकडे नाही का पाहू शकणार? सो कॉल्ड ग्लोबल शाळेत शिकणारी आपली मुलं खरच जागतीक स्पर्धेला तोंड देण्यासाठी तयार होत आहेत का? वाटत नाही मला असं. बाइक ला पैसे हवे म्हणून आजीचा खून करणारा, भन्नाट वेगाने गाडी चालवून मृत्यूला जवळ करणारा आझरुद्दींचा मुलगा, अशी अनेक उदाहरणे आसपास दिसतील. वयाच्या ५व्या वर्षी फेसबूक वर पडीक राहणारी तासन्तास मोबाइल वर गप्पा छाटात असलेली, जंक फुडवर पोसली जात असलेली, शाळेत जाताना काही हजारो रुपये पॉकेटमनीं म्हणून खर्च करणारी ही पिढी काय मूल्य घेऊन जगणार आहे, कष्टाचं मोल कधी जाणू शकतील ते? समवेदना म्हणजे काय हे अनुभवलं असेल त्यानी? एकीकडे अशी कमकुवत मूल्य घेऊन जगणारी आपली मुले नि दुसरीकडे असुया, चीड, द्वेष मनात बाळगणारा एक मोठा समाज. स्फोटक असेल परिस्थिती.

2 comments:

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!