Tuesday, October 18, 2011

सुनीताबाईं

आठवतं ते अनेक वर्षांपूर्वी जेंव्हा सुनीताबाईंचं " आहे मनोहर तरी" पुस्तक नुकतच प्रकाशित झालं होतं, कॉलेज च्या मासिकात त्यावर मी एक लेख लिहिलेला होता...तो आता नीट आठवत नाही. पण तेंव्हापासून त्या मझयासाठी मॉडेल बनल्या मॅझयाही नकळत. आज पुन्हा एकदा ते पुस्तक पुन:प्रत्यायचा आनंद तर देतच पण अनेक त्यांच्या आचार-विचारांच्या पाऊलखूणा मी मझयात पाहू शकते अगदी त्यांच्या आईच्या देखील.



"आहे मनोहर तरी गमते उदास" अशी मनाची स्थिती अनेकदा होते, अनेकदा माझी मी नसतेच अशी अवस्था, कोणी आसपास असू नये, कोणी बोलू नये, डिस्टर्ब करू नये, फक्त स्वत:चाच स्वत:शी संवाद चालू राहावा...वेगवेगळे आठवणींचे पक्षी सतत मनात पिंगा घालत असतात, कधी हवेसे, तर कधी नकोशा आठवणी. जगापासून तुटक राहायला मनापासून कधी कधी आवडत्न मला. तसाच जीवन मूल्य जपायला. याच धारेत मी जगापासून दुरावते...पण त्याचीही खंत फारशी वाटत नाही मला.

नाती निभावणे तसं सोपं कधीच नसतं आणि त्या व्यक्तींसाठी ज्या सूक्ष्म विचार करून प्रत्येक गोष्ट करतात त्यांच्याकरिता तर ती एक तारेवरची कसरत बनून राहते. पु. ल. सारख्या व्यक्तीची सहचरि बनणं हे तर नक्कीच साधा सुधं काम नव्हतं.अनेक रोष पत्करून त्यानी ते निभावलं. आपल्याच जवळच्या व्यक्तींकडे इतकं तटस्थपणे पाहणं, त्यांच्या गुण-दोषांसह त्याना स्वीकारणं आणि असं करताना आपल्यातलं वेगळेपण तरीही जपणे. अजून एक गोष्ट त्या काळातच परिणाम करून गेलेली होती ती म्हणजे आयुष्यावर ठसा उमटवणार्यांच्या बद्दल ऋण व्यक्त करण्याची त्यांची सवय.... नेमक्या व्यक्त केलेल्या त्यांच्या भावना, उगीच कोणताही खोटा मुलामा न चढवता......बोरकर, जी. ए., आई, आप्पा, सासूबाई, अगदी भाई सुद्धा सुटले नाहीत यातून. सोप्या नसतात या गोष्टी. ह्या खूप भावतात मला. आयुष्यात भेटलेल्या आणि न भेटलेल्या अनेक व्यक्ती कळतनकळत तुम्हाला घडवतात. सुनीताबाईंचा वाटा त्यात थोडा जास्तच.



"संधिप्रकाशात अजून हे सोने, तो माझी लोचने मिटो यावी" ही सुनीताबाईंच्या आवडत्या बोरकरांची कविता तर पु. लं च्या ओठी नसेल ना?

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!