Friday, June 24, 2011

I wish to say thank you to my friend

अनेकदा आपल्या आयुष्यात माणसं का आणि कशी येतात आणि आपण त्यांच्या रंगात कधी आणि कसं रंगून जातो तेच कळत नाहीवेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या परीनेआपले आयुष्य घडवत असतातअनेकदा मी विचार करते की कितीतरी लोकांचा असा ठसा माझया आयुष्यावर आहे.अनेक नात्यांशीवाय मी अपूर्ण आहेअनेकव्यक्तींशीवाय माझया आयुष्याला काही अर्थ नाही.    

तरीही नात्यांची गुंतागुंत ही होतेचएक अधिक एक दोन असं नेहमीच घडत नाहीकाही असच घडलं होतं माझयाबाबतीतहरवून बसले होते मी नात्यांचे अर्थ . अनेकगोष्टी अकारण वाटू लागल्या होत्या मला. "लाइफ ईज़ ब्यूटिफुलहे स्वत:चे वाक्य मी विसरले होतेआयुष्यातून रस हरवणे म्हणजे या पेक्षा वेगळं काही नाही.

आजकाल कोणतीही नवीन ओळख होताना मला पहिला प्रश्न पडत होता तो "काकशालानकोच ना पुन्हा सारं तेच". जवळपास मी टाळतच होते नवीन माणसं आणिनवीन ओळखी

तरीही तू अवचित येणार्या पावसासारखा आलास.... तुझया मैत्रीच्या वर्षावाने चिंब भिजून पुन्हा बहरून आलेतू पुन्हा एकदा मला हसायला शिकवलेसपुन्हा एकदानात्यांचे अर्थ नव्याने तपासून पाहायला लावलेसपुन्हा एकदा आयुष्याकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिलीस.... कदाचित हे सारं तुझया नकळत घडलं असेल.

मैत्री वेगळी काय असते...एकमेकांच्या साथीने एकमेकाना समृद्ध करणं हीच तर मैत्रीआयुष्यातली सर्वात सुंदर गोष्टकदाचित प्रेमाचा बहर उतरत असेल काही काळानंतरप्रेमाचे रंग बदलत असतीलकदाचित फिकेही होत असतील.......पण मैत्रीचं तसं नाहीएकमेकान सोबत नसताही आपण सोबतच असतोअनेकदा शब्दांविनाही मनं ओळखता येतातकोणीतरी आपलं ही भावनाचं मोठी सुखवणारी असते अन् तरीही प्रेमातली बंधिलकी नसतेआज पुन्हा एकदा नव्याने आयुष्याकडेवेगळ्या नजरेने पुन्हा पाहता येताय मला ते फक्त तुझयामुळे!!!





No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!