Friday, July 29, 2011

शिक्षणाच्या नावाने......

आपण नेहमी असं ऐकतो "आजकालच्या शिक्षणाचा दर्जा खूप घसरला आहे." खरं तर शिक्षकांचा दर्जा कमी झालाआहेकारणं काहीही असोतपण ते खरं आहेआजकाल माझया कुटुंबात शाळेत जाणारी वेगवेगळ्या वयाची काहीमुलं आहेतत्यांचे अनेक किस्से कायमच करमणूक करतात.
माझी भाची नेहावय वर्ष १०वडील शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधे कॅप्टनत्यामुळे आख्खं जग फिरून झालेआहेशाळेत बाई भूगोलाच्या तासाला शहरांच्या नावाच्या भेंड्या हा खेळ घेत होत्याहिच्यावर  पासून शहरसांगायची वेळ आलीतिने सांगितले " रॉटरडॅम". बाई म्हणाल्या "शहराचे नाव सांग नेहाधरणाचे नको". चिडूनघरी आली आणि हे ऐकून आम्ही खूप हसलो.
शशांकने शाळेत एकदा विचारले "ट्यूब ला मराठीत काय म्हणतात?" सर म्हणाले ट्यूब म्हणजे मलमहा घरीयेऊन म्हणतो भिंतीवरच्या ट्यूबमधे कोणते मलम आहेखूप वेळाने माझी ट्यूब पेटली हा घोटाळा लक्षात यायला.
संस्कृतीला संस्कृत शिकवायला नवीन बाई आल्या आणि म्हणाल्या " काव्य शास्त्र विनोद मधील उतारा म्हनहीघरी येऊन विचारते "ह्या उत्तम संस्कृत संस्कृतीला कसं शिकवतील?" या प्रश्नाचं काही उत्तर मझयाकडे नाही.
पुत्यांच्या चितळे मास्तरांचं वर्णन करता थकत नाहीत आणि आजकाल मुलांना मागच्या वर्षीच्या शिक्षकांचंनाव आठवत नाहीकाय करावंआजही कित्येक लोकं आपली शिक्षण पद्धती खूप उजवी मानतातमाझया एकमित्र यूएसहून परत आला का तर त्याला त्याच्या मुलाला भारतात शिकवायचं आहे.
आपण त्यात काही बदल करत नाहीआणि आपलं महान सरकार दर दिवशी नवीन प्रयोग करतं आपल्या मुलांवर.आज काय परीक्षा नाहीतमग काय तर फक्त मूल्य मापनगुणवत्ता यादी नाहीतर कधी बेस्ट ऑफ फाइवमगमार्कांचा पाऊस !
पण यात नवल ते कायआपल्यापैकी प्रत्येकालाच डॉक्टरइंजिनियरवकील व्हायचं असतंकोणालाच शिक्षकव्हायचं नाहीमग ज्याना काहीच दुसरं करता येत नाहीते जाऊन बी-एडडी-एड करतातपैसे देऊन शिक्षण सेवकबनतातमग पुन्हा तेच रडगाणेशिक्षणाचा दर्जा खालवलाय म्हणजे नक्की काय बदल झालायपायथागोरसचासिद्धांत बदललाय काकी + होतात आजकालनाही ना...... म्हणजे शिक्षकांचा दर्जा खालवलाय. .या सगळ्याला आपण जबाबदार आहोतकधी कधी वाटतं सारं सोडून एखादी शाळाजॉइन करावीथोड्या मुलांचं तरी भलं होईल.

Wednesday, July 27, 2011

आदतन तुम ने कर दिए वादे



अहमद फराजशिवाय जर अजून कोणी साध्या शब्दात आशयघन लिहीत असेल तर ते म्हणजे गुलजार. त्यांची अशीच एक रचना म्हणजे ही कविता..........

आदतन तुम ने कर दिए वादे
आदतन हम ने ऐतबार किया
तेरी राहों में हर बार रुक कर
हम ने अपना ही इन्तज़ार किया
अब ना माँगेंगे ज़िन्दगी या रब
ये गुनाह हम ने एक बार किया

Tuesday, July 26, 2011

ज़िंदगी यूँ हुई बसर तन्हा




ज़िंदगी यूँ हुई बसर तन्हा
क़ाफिला साथ और सफर तन्हा
अपने साये से चौंक जाते हैं
उम्र गुज़री है इस कदर तन्हा
रात भर बोलते हैं सन्नाटे
रात काटे कोई किधर तन्हा
दिन गुज़रता नहीं है लोगों में
रात होती नहीं बसर तन्हा
हमने दरवाज़े तक तो देखा था
फिर न जाने गए किधर तन्हा

Sunday, July 24, 2011

तेरा जाना.....





Someone at an Open forum asked “does a person who initiates a break up go through same pains? Does that person ever think about the bond, the sharing and the time spent together?”


This is a very common and often asked question by a broken heart. If we are talking about any genuine relationship and not a kind of one our bollywood celebrities have, then my obvious reply would be "Yes…They do". Only difference is he/she suffers while in relationship and the other one after the break up.


The person who initiates a break up can have number of reasons for it. It may be a long time he/she feels a need to give a second thought for the relationship they are into. There can be a single reason or a combination of many, which irritates one. He/she might have taken a long time before reaching at conclusion that “It’s all over”. Thousands of reason one can list which are the foundation for a break up. However, it is very painful to reach at the verdict; time taken depends upon how deeply one is involved. It is a fight between the brain and the heart. We always see a tendency to prove how wrong the person was who arrived at a decision of break up.


For sure, one can notice few indications before the actual break up; like hesitation for spending time together, some mention of a third person often within your conversation, a often criticism that “you have changed a lot”, reduced phone calls/chats, touch becomes unwanted, one stops using whatever received as gift from him/her, forgetting his/her birthday is an deliberate step and so on…. Believe me its not that easy it’s a fight within yourself. Most of the time the preference is given for a compromise….we Indians are always taught that way …with some examples of few around you who have opted for it in their past. But time has changed. Compromise has not remained easy opt in today’s life especially when coping up with all tensions is no less than a war. In such a scenario if your relationship is one of the headache or discomfort zone, break up and get rid is the preferable act.


So the question remains “how to deal with such break up when it’s his/her decision and not yours?” Try to save the it with every possible way; however once you are convinced that you are unable to save it go for the most difficult task “Shift + Delete” the whole episode of your life. Lock it somewhere in your heart forever. This is something thousand times tougher. Time is the best medicine for this wound. Agony, pain remain until you realize what went wrong, or you find some else in your life.


It is a human tendency; you are careless as long as you know everything is at its place. All of a sudden after break up things which are no more belongs to you; become very much significant; suddenly you start respecting the relationship and you feel your counterpart do not value it same way. Which is not always a case. He/she might have struggled a lot before reaching at this decision, it is equally or more painful, but he/she has shown a strength to deal with it. So it’s wise stop criticizing him/her for the verdict and respect that equally painful end of the episode.

Friday, July 22, 2011

Faraz once again

Couple of days back I posted few lines from Faraz on my office blog. There are few friends, within my organisation who do read my write ups. One such friend replied to the the original and that continues for some time., which became interesting conversation.


Faraz once again.....
anagha_apte7/19/11 10:30 am

usay dil ka haal sunao kesay
mom ka ghar hai chiraag jalaon kesay
door hota to usay dhoond bhi letay faraz
jo rooh mein chupa behta he usay paon kesay

Kaurnik

पाना क्यूँ है जब वोह तेरा है,
रूह में तेरी ही तो उसका बसेरा है,
हाले दिल से वोह वाकिफ है,
तू घर को जला दे फिर देख सवेरा है

Anagha
vo meharabaa.N hai to iqraar ky uu.N nahii.n kartaa
vo bad-gumaa.N hai to sau baar aazmaaye mujhe

Kaurnik

बदगुमानी उसकी, मेहरबानी का ही तोहफा है,
हर इकरार पर उसको, मिला बस एक धोका है,
वफ़ा के नाम पर उसे शायद फिर भी बरोसा है,
उसका इकरार ना करना आज़माइश ही तो है तेरी

Anagha
Meharaban teri nazar, teri adayen qatil
tujhako kis nam se ai dost pukara jaye
Mujhako dar hai tere wade pe bharosa karake
muft may ye dil e khushafaham na mara jaye

Kaurnik

दिल को समझाओ, यह मचलता क्यूँ है,

खुश्फेह्मियों के आगन में, यह टहलता क्यूँ है.

माना की कतल करती है आँखें मेरी,

पर अदाओं का ज़ोर सब पर चलता कहाँ है.

तू मुझे खुदा कह, या कह ले साकी,

वादों पर अमल लाना मेरी फितरत कहाँ है.

Anagha
Dil jo TuuTaa to kaii haath duaa ko uThe
Aise maahaul mein ab kis ko paraayaa samajhun

Zulm ye hai ke hai yaqtaa terii begaanaaravii
Lutf ye hai ke main ab tak tujhe apanaa samajhun

Friday, July 15, 2011

रहते थे कभी जिनके दिल में

गेली अनेक वर्ष, जवळपास कळायला लागल्या पासून मी आशाभक्त आहें. माझया लेखी त्यांच्या इतकं बहुविधता असलेलं फक्त त्याच गाऊ शकतात. माझया अनेक भावना त्यांनी सूरमयी केल्या आहेत. माझे अनेक क्षण त्याच्या सुरांतून व्यक्त झाले आहेत.


आजकाल थोडा बदल झालाय, अचानक मी लताभक्त झाले आहे. जवळपास १०० गाणी माझया संग्रही आहेत. लता दीदीन्च्या गाण्याने वेड लावलाय. अगदी त्यांच्या पहिल्या गाण्यापासून अनेक उत्तम गाणी मी सदैव ऐकत असते. त्यांच्या गोड आणि नाजूक आवाजाची मोहिनी काही उतरत नाही. त्यांच्या आवाजावर असलेला नुर्जाहांन चा प्रभाव, नंतर त्या प्रभावातून बाहेर आल्यानंतरचा सुरेल गळा. ह्या सम हाच. कशाचीही उपमा देताच येत नाही. कितीही वर्णन केलं तरी अपुरेच.


लता आणि रोशन यांच्या अनेक सुंदर सुरावटी आजही तितक्याच मनाला भावतात. मला कधी कधी या गाण्यांच्या चिरतारुण्याचं आश्चर्य वाटतं, माझया मागची पिढी, माझी पिढी याच सुरांवर आम्ही पोसलो, वाढलो, समृद्ध झालो; पण माझया पुढच्या पिढीलाही यानाच ऐकताना पहिलं की मी चकित होते.


काही गाणी हृदयात कळ उठावतात, काही डोळ्यात पाणी आणतात, काही तो प्रसंग समोर जिवंत उभा करतात. असंच हे एक गाणं, ममतामधील....नुसता गाणं ऐकूनही पुरतं दृष्य समोर उभा राहतं. लतादिंचा आवाज सगळा दर्द पोहचावतो तुमच्यापर्यंत. 


रहते थे कभी जिनके दिल में, हम जान से भी प्यारों  की तरह 
बैठे हैं उन्ही के कूंचे में हम, आज गुनाहगारों की तरह


दावा था जिन्हें हमदर्दी का, खुद आ के पुछा हाल कभी
महफील में बुलाया हैं, हम पे हसने को सितमगारों की तरह


बरसों के सुलगते तम मन पर, अश्कों के तो छींटे दे ना सके
तपते हुए दिल के जख्मों पर, बरसे भी तो अंगारों की तरह


सौ रूप भरे जीने के लिए, बैठे हैं हजारो ज़हर पिए
ठोकर न लगाना, हम खुद हैं गिरती हुयी दीवारों की तरह

Thursday, July 14, 2011

Faraz has words for each thought, each feeling....this one is just perfect for todays situation

Hum Wo Patty Nahi Jo Shakh Se Gir Jaty Hain FaraZ..
Kehdo Toofano Say Zara Okat Main Rahen..

Wednesday, July 13, 2011

पुन्हा एकदा मुंबईत बॉम्बस्फोट :(

पुन्हा एकदा मुंबईत बॉम्बस्फोट...... कधी थांबणार आहे हे सारे? एका वर्ल्ड ट्रेड नंतर अमेरिकेवर पुन्हा कोणी हल्ला चढवलेला नाही..मात्र आपण रोज मृत्यूच्या छायेत वावरतो आहोत? वर्ल्ड ट्रेड सेंटर वरचा हल्ला अमेरिकेच्या जिव्हारी लागतो आणि ते त्याचा पुरेपूर बदला ही घेतात. अगदी आपल्या मित्रदेशात जाऊन त्याना कल्पना न देता कारवाई करतत. अमेरिकेचं एक बरं आहे, त्याच्यासाठी त्यांच्या हितापेक्षा बाकी काही महत्वाचं नाही. आपलं तसं नाही ना?....आपल्याला आपली सॉफ्ट टार्गेट ही प्रतिमा जपायची आहे, आपल्या राजकारण्यांचं हित आपल्याला जपायचं आहे.


कोणत्याच हल्ल्यानंतर आपण पेटून उठत नाही, ताज हॉटेलवरील नाही, रेलवेतले बॉम्बस्फोट नाहीत, अगदी संसद भावनावरील हल्लादेखील नाही. डी-गँगशी असलेले संबंध ना राजकारण्यांच्या आड येतात ना तथाकथित सेलेब्रेटिजच्या. या सार्यांची बंधिलकी फक्त स्वार्थ आणि पैसा या दोनच गोष्टींशी. देशप्रेम हा १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला भाषणं देण्याचा विषय उरलाय फक्त. तो आपलं जीवनमुल्य असावा असं कोणालाच वाटत नाही. ज्याना तसा वाटतं त्यांच्या मताला काही किंमत नाही. आपली सहन करण्याची क्षमता तरी किती? रोजच्या जीवनात आरे ला कारे असा आपला समाज अशा वेळी मात्र सहानशीलतेच्या कळस गाठतो. का? कशासाठी? कितीक दिवस? याची उत्तरे द्यायला संसदेत बसणारे आपले महान नेते बांधील समजत नाहीत. देशविक्रीच्या मोठ्या कामात ते सारे व्यस्त आहेत. किती दिवस आपण त्याच्यावर विसंबून राहणार यासाठी.


क्रांतीची गरज आहे या देशाला.....पण सर्वात आधी पेटून उठणार्‍या रक्ताची गरज आहे. ना की मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढण्याची. लोकपाल, भ्रष्टाचार याविरुद्ध सरकार विरुद्ध लढण्यापेक्षाही महत्वाचं आहे, सरकारला जागं करणं, दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी, दहशतवादाविरुद्ध एक पाऊल असं उचललं गेलं पाहिजे की पुन्हा आपल्याकडे बघण्याची कोणाची हिंमत न व्हावी. काय फायदा आहे आपण सॉफ्ट राहण्याचा? कोणाचं हित साधतो आहोत आपण यातून? पुढे याचा जेंव्हा इतिहास सांगितला जाईल; तेंव्हा आपली पुढची पिढी आपल्याला विचारेल "की इतकं सारं होत असताना तुम्ही काय करत होतात?" काही उत्तर नसेल आपल्याकडे तेंव्हा....आत्ताच एक अपडेट पहिलं मी-


सौदा यही पे होता है हिन्दोस्तान का.... संसद भवन में आग लगा देनी चाहिए, सौदा यही पे होता है हिन्दोस्तान का

Monday, July 11, 2011


मागच्या महिन्यात माझा भाचा शाळेत जाऊ लागला. सुरुवातीचे दिवस माझी बहीण त्याच्या बरोबर शाळेत जात होती. एक दिवस फोनवर बोलताना ती म्हणाली "मल्हारच्या वर्गात वीस मुले आणि पाच मुली आहेत" मी विचारलं " मग तर काय? त्यात काय विशेष?"तिचं उत्तर होतं "अगं, जेंव्हा त्याच्या लग्नाची वेळ येईल त्यावेळी लाखो रुपये हुंडा देऊन मुलगी आणावी लागेल घरी , जर असाच मुला-मुलींचा रेशियो राहिला तर.....मी मनात विचार केला, ज्याना मुली आहेत त्याची दु:खं अजून वेगळी.


तेंव्हा मी हसले नंतर वाटलं खरच तर आहे तिचं म्हणणं. मग कोणीतरी एक सिग्नेचर लाइन टाकलेली पाहिली. "Save Girl Child, we can save Tigers later". मग सोनोग्राफी सेंटरवर टाकलेल्या धाडी. सर्वत्र स्त्री-भ्रूण हत्येविरुद्ध मोहिमा. परवाच सुबोध भावेचा एक लेख वाचला, २०२२ मधे जाऊन लिहिलेला.छान होता असं सुद्धा लिहिवत नाही. 


एकीकडे या सार्‍या गोष्टी ठळक छापल्या, बोलल्या जात असताना, पेपर मधील बलात्काराच्या बातम्यांकडे आपण दुर्लक्ष करतोय का? कोणत्या आईला आपली मुलगी या देशात सुरक्षित वाटते? प्रत्येक आई मनातून  धास्तावलेली असते. बोलूनही दाखवता येत नाही आणि सहनही होत नाही अशी ही भीती. समाजातील कोणत्याही स्तरातील,कितीही शिकलेली आई असो, प्रत्येक आईच्या बाबत ही भीती खरी आहे. स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरूष समानता वगैरे नाही हो.....साधं माणूस म्हणून सुखाने जगता यावं  इतकीही अपेक्षा नाही का बाळगू शकत या देशात? अनेक देव्यांच्या नावाने मंदिरे बांधणार्‍या आपल्या समाजात स्त्रीचीच का इतकी वाईट परिस्थिती? परवाच्या बातमीने तर कहरच केला. प्रत्यक्ष आईही आपल्या दोन्ही विवाहित पोरीना वाचवू शकली नाही.


प्रश्न इतकाच आहे की एक समाज म्हणून आपण मृतवत होत चाललो आहोत का? विश्वचषक जिंकणे, सेन्सेक्सची कोटीच्या कोटी उड्डाण, लाखो रुपयांची मिळणारी पॅकेज, बाजारात नवीन येणारं सेदन मॉडेल, आय-पॉड ४,ऐश्वर्या राय आई होणार, शाहरूखचा नवीन सिनेमा यापेक्षाही काहीतरी महत्वाचे आहे, जे आपण गमावत चाललोय आणि ती म्हणजे मूल्ये. जी कोणत्या बाजारात विकत मिळत नाहीत, कोणत्या शाळेत  शिकवत नाहीत, बर्‍याचशा प्रमाणात आपण ती जन्माला येताना बरोबरच घेऊन आलेले असतो, थोडीफार जडणघडण समाज करतो.


कायदा सुव्यवस्था नावाची कोणतीच गोष्ट या देशात नाही यावर हळूहळू शिक्कामोर्तब होत चाललय अनेक अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये, यात आता कुठेतरी बदल व्हायला हवाय. यासारख्या गुन्ह्यांसाठी इतकी कडक शिक्षा आणि ती ही इतकी तत्काळ असायला हवी की गुन्हा करताना ही माणूस हजारदा विचार करेल. स्त्रीचा आत्मसन्मान कधी जपायला शिकणार आहोत आपण? दहा निरपराध लोकाना शिक्षा झाली तरी चालेल पण एक गुन्हेगार सुटता कामा नये अशी भूमिका का घेत नाही आपण? 

Thursday, July 7, 2011

उमलत्या कळीचे सर्वस्व तूच होतास
थरथरत्या अधरांवर नावही तुझेच होते
मुक्याच होत्या भावना कळीच्या
तुला जरी ना कळल्या परि तूझ्याचसाठीच होत्या


दरवळताना शब्द तुझे मोगर्‍यापरी
गंधित अधरांवर नाव तुझेच होते
मुक्या भावनांच्या झाल्या मुक्या वेदना
तुला जरी ना कळल्या परि तूझ्याचसाठीच होत्या

Wednesday, July 6, 2011


नाते क्षणांचे न कळे झाले कसे युगांचे
ऋतूगंध त्या क्षणांचा अजूनही मोहवी
सारे तुझेच होते सारे तूझयाचसाठी
माझी न राहीले मी सर्वस्व तूजला वाहूनी

Sunday, July 3, 2011

कोण्या देशीचे पाखरू


कोण्या देशीचे पाखरू उतरले मनाच्या अंगणात
बांधले घरटे जमवूनि काडी काडी
नाचले बागडले मनमुक्त विहरले
व्यापून टाकले सारे अवकाश त्याने

मी ही वेडी सुखावले
वाटले हे सारे आपुल्यासाठीच
हे घरटे त्याचे नि माझे,
फुलवलेला पिसारा ही माझ्याचसाठी

अंगणात वेचायचे दाणे संपले कदाचित
जन्माच्या शपथा बांधू नाही शकल्या
मोडून घरटे निघाले पाखरू
आता कशी मना सावरू