Friday, September 16, 2011


विचारू नका कवीला त्याच्या कवितेचे मूळ,
नसतात ते नुसते शब्द, असते ती भळभळती जखम
कोणाची एक नजर, एक हाक, एक आठवण पुरेशी
पण आनंदाने उरी जपावे असे वार फारच थोडे असतात नाही

Wednesday, September 7, 2011

कोण्या देशीचे पाखरू


मी काही दिवसांपूर्वी ब्लॉगवर लिहिलेल्या कवितेला, माझया ऑफीस ब्लॉग वर मिळालेले हे उत्तर. मूळ कविते इतकच सुंदर!

कोण्या देशीचे पाखरू उतरले मनाच्या अंगणात
बांधले घरटे जमवूनि काडी काडी
नाचले बागडले मनमुक्त विहरले
व्यापून टाकले सारे अवकाश त्याने

मी ही वेडी सुखावले
वाटले हे सारे आपुल्यासाठीच
हे घरटे त्याचे नि माझे,
फुलवलेला पिसारा ही माझ्याचसाठी

अंगणात वेचायचे दाणे संपले कदाचित
जन्माच्या शपथा बांधू नाही शकल्या
मोडून घरटे निघाले पाखरू
आता कशी मना सावरू


अधीश गोखले-


वेचावयाचे दाणे, अनेक होते,
बंध युगांचे, बांधेलच होते,
तरीही निसर्गाचे, नियम अनेक,
पालन कराया, पाखरू उडाले,

ऋतू बदलला, गारेगार झाला,
घरटे मोडुन पक्षी उडाला,
त्याच्या स्वत:च्या स्वप्नांच्या गावी,
जिथे उन्हाची ऊब असावी,

येईल उन्हाळा तेव्हा परतेल,
काड्या जमवूनी, घरटे करेल,
पुन्हा आनंदे, फुलवेल पिसारा,
वाहतील आनंद अश्रूंच्या धारा