Tuesday, August 30, 2011

उगाच काय ग छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद?


संदीप खरे माझा अजून एक खूप आवडता कवी. त्याचा माझयाकडून असा एकेरीत उल्लेख ऐकला की माझा एक मित्र मला चिडवतो "संदीप अगदी आपल्या घरचाच आहे नाही?" साध्या सोप्या शब्दात तुमच्या भावना तुमच्या पर्यंत तोच पोहचावतो. तुम्ही जगलेले क्षण तो तुमच्यासमोर असे काही उभे करतो आणि तुम्ही विचार करत राहता "अरे, हे तर माझेच अनुभव, अगदी अचूक कसे याने शब्दात पकडलेले?" खरच बाप माणूस आहे तो.


मला कधीतरी कविता जन्माला येते ती कशी हे खूप जवळून अनुभवायचं आहे. माझया विश-लिस्ट वर एक गमतीशीर गोष्ट आहे. देवा पुढचा जन्म माणसाचा असेल तर या माणसा सोबत तो असू देत...कोणत्याही नात्याने चालेल...........त्याची सर्वात जवळची मैत्रीण असो, त्याची बायको म्हणून असो, बहीण म्हणून असो अगदी त्याची मुलगी म्हणून सुद्धा चालेल. त्याच्या कविता त्याच्याच शब्दात ऐकणे हा तर एक सुरेख अनुभव असतो. असं वाटतं की लय या कवितेतच आहे, संगीतकाराला फारसे कष्ट त्यावर घ्यावे लागत नसतील.


मी मला खूप नशीबवान समजते की अशा मातीत मी जन्माला आले.....की जिथे कला, साहित्य. संस्कृती यांचा उत्तम संगम आहे. खूप मोठा वारसा आपल्यापाशी आहे. किशोरी ताइंचं, जसराजांचं गाणं, गुरुदत्त वहिदा यांचा अभिनय, रेहमान, पंचम, सलील चौधरी असे एक से एक सरस संगीतकार, गुलजार ते तर चिरतरुण आहेत. बा. भ. बोरकर,शांताबाई, कुसुमाग्रज,सुरेश भट असे अनेक कविवर्य, लता,आशा, रफी यांचे गुंजणारे सूर, कुमार गंधर्वांचे निर्गुनि भजन गाताना लागलेला सूर..........प्रत्येक गोष्टीने भारून गेलीये मी. या पैकी अनेकाना मी कधी प्रत्यक्ष पहिलं किंवा प्रत्यक्ष ऐकलेले नाही तरीही....


तोच वसा मला माझया पिढीत काहीजण चालवताना दिसतात जसं की राहुल देशपांडे, संजीव अभ्यंकर, संजीव चिमलगी, वैभव जोशी, सलील कुलकर्णी आणि संदीप. त्याचीच एक अत्यंत अर्थवाही आणि प्रवाही देखील कविता...................


उगाच काय ग छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद?
उगाच काय माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नाद?


मी, तू, जगणे, पृथ्वी कुणीच इतके वाईट नाही
अधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाही


अगं विरस व्हावा इतके काही उडाले नाहीत इथले रंग
स्पेशल इफेक्टशिवायसुद्धा शहारून येऊ शकते अंग


अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत
अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत


पैसे भरल्यावाचून अजून डोळा तारे दिसत आहेत
झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत


अजूनतरी कर नाही आपले आपण गाण्यावर
सा अजून सा च आहे , रे तसाच रिषभावर


अजून देठी तुटले फूल खाली पडते जमिनीवर
छाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवर


स्पॉन्सर केल्यावाचून अजून चंद्र घाली चांदडभूल
अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल


सागर अजून गणती वाचून लाटेमागून सोडी लाट
अजून तरी कुठलीच जकात घेत नाही पाउलवाट


थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन
पाउस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदून


काही काही बदलत नाही…. त्वेषाने वा प्रेमाने
जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने


आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही
आणि इतक्या लवकर होईल प्रलय असे काही वाटत नाही

Saturday, August 27, 2011

आये कुछ अब्र कुछ शराब आये...........


ऑफीस मधे माझया बाजूच्या क्यूबिकल मधे एक महान आत्मा बसतो. एक गमतीदार व्यक्तिमत्व आहे ते. एखादी गोष्ट तुम्हाला गूगलवर सापडत नसेल तर फक्त त्याला सांगा...अर्ध्या तासात तो तुम्हाला ते मिळवून देणार. एखादी मैफील तुम्हाला आठवते आहे आणि त्याचा रेकॉर्डिंग मिळत नाहीए, त्याला सांगा... आणि असं असतानाही आमच्यात खूप कमी संवाद होता. 


सद्ध्या ऑफीस मधे माझी सामानाची बांधा बांध सुरू आहे :) त्यामुळे मी काही डेटा त्याला ट्रान्स्फर करत होते. त्यात त्याला एक  फराझ नावाचं डॉक्युमेंट दिसलं, आणि आमच्यात संवाद सुरू झाला.त्याच्या कडे असंख्य गाणी आणि गझलांचा खजिना आहे. तो जगजितसिंग यांचा शिष्य आहे. असं अनेकदा घडतं, की आपल्या जवळच्या बरोबर संवाद नसतो आणि फेसबूकवर मात्र आपण शेकडो मित्र मिरवत असतो. तसंच काहीसं हे देखील! बोलता बोलता क्षणात त्याने जवळपास 8 जी बी चा डेटा मला ट्रान्स्फर केला, ज्यात मेहन्दी हस्सन आहे, मदन मोहन आहेत, जयदेव आहेत. त्यापैकीच एक गझल फैज अहमद फैज यांची....मेहन्दी हस्सन यांच्या आवाजातील....खूप सुंदर आहे....


आये कुछ अब्र कुछ शराब आये
उसके बाद आये जो अज़ाब आये


बाम-ए-मीना से माहताब उतरे
दस्त-ए-साक़ी में आफ़ताब आये


कर रहा था ग़म-ए-जहाँ का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आये


हर रग़-ए-ख़ूँ में फिर चराग़ाँ हो
सामने फिर वो बे-नक़ाब आये


उम्र के हर वरक़ पे दिल की नज़र
तेरी मेहर-ओ-वफ़ा के बाब आये


इस तरह अपनी ख़ामुशी गूँजी
गोया हर सिम्त से जवाब आये


'फ़ैज़' की राह सर-ब-सर मंज़िल
हम जहाँ पहुँचे कामयाब आये

Saturday, August 20, 2011

चळवळी, आंदोलने, उपोषणे आणि आपण...................


गेले काही दिवस सर्वत्र फक्त अण्णा अण्णा आणि अण्णा असं वातावरण आहे. ऑफीस मधे बुलेटिन बोर्डवर फक्त हाच एक विषय आहे. अचानक सर्वत्र चैतन्य पसरल्यासारखं मला वाटत आहे. असं काही जेंव्हा समाजात घडत असतं तेंव्हा लोकांच्यात काहीतरी संचारते. कदाचित माणसाच्या सामाजिक असण्याच्या गरजा यातून भागवल्या जातात. अनेकानी मला विचारलं की इतकं सारं चालू असताना तुझयाकडून काहीच प्रतिक्रिया कशी नाही? तू खरच इतकी कामात व्यग्र आहेस का? नाही...... असं काही नाहीये. खूप सजगपणे मी या सार्‍या घटना बघू इछिते. या सार्‍या गोष्टींकडे बघण्याचा माझा एक दृष्टिकोन आहे.

एक जन लोकपाल विधेयक जादू ची कांडी बनेल आणि सारे प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. गरज असणार्‍या अनेक उपायातील तो एक घटक आहे. ही चळवळ योग्य की अयोग्य याबाबत मी काही बोलणार नाही. परंतू एखादी चळवळ उभी राहताना तिच्यातून काय मिळवायचा प्रयत्न आहे हे जसं नक्की माहीत हवं तसच ती गोष्ट मिळवल्यानंतर काय? याचं ही उत्तर खूप सुस्पष्ट असायला हवं.पुढचा मार्ग खूप सुस्पष्ट नजरे समोर हवा आणि सर्व समाजाला सोबत घेऊन त्या वाटेवर चालू शकेल असं भरभक्कम नेत्रुत्वही! कदाचित याच गोष्टीचा अभाव स्वातंत्र्य चळवळीतही होता. स्वातंत्र्य मिळालं, पण पुढे हा देश कसा चालवणार आहोत, समाज कसा घडवणार आहोत, परराष्ट्र व्यवहार कसा असणार याबद्दल कदाचित सर्वसमावेशक असा विचार नव्हता झाला. ज्याची फळे आज आपण कदाचित भोगत आहोत. नाहीतर ६४ वर्षानंतरही आपण मूलभूत प्रश्ञांमधेच अडकून नसतो पडलो, शिक्षण, जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद आणि भ्रष्टाचार हे सारे प्रश्न आजही आपल्याला भेडसावत नसते राहीले. माझा काही अनुभव असं सांगतो की हे सारं तत्कालीक असतं. गतनूगतिकोलोके असे अनेक जण त्यात असतात, चळवळ खूप मोठी भासते अन् नंतर भक्कम असं काही प्रत्ययास येत नाही.

भ्रष्टाचार ही एका दिवसात किंवा एका सरकारच्या काळात लागलेली कीड नाही. गेले ६४ वर्षात हा वृक्ष पसरलाय. अती उच्च पातळी वरुन थेट तुमच्या आमच्या पर्यंत त्याचा फैलाव आहे. आपल्या सगळ्यांचा भ्रष्टाचाराला विरोध आहे; पण बरेचदा तो विरोध मला एकांगी वाटतो. भ्रष्टाचाराला विरोध करताना; आपणही आपलं काही नुकसान करून घेण्यास तयार आहोत का? म्हणजे एका सरकारी कार्यालयात काही काम आहे, जे नाही झाले तर माझ काही नुकसान होऊ शकतं आणि ते होण्यासाठी तेथील कर्मचारी लाच मागत आहे, तर नुकसान सोसून भ्रष्टाचाराला आपल्यापैकी कितीजण विरोध करतील? उदाहरण घ्या एका बांधकाम व्यावसायकचं भली मोठी रक्कम एका जमीनीच्या तुकड्यात गुंतवल्यानंतर बांधकामास लागणारी परवानगी मिळवण्यासाठी लागणारी लाच सरकारी कार्यालयात न देणे त्याला किती काळ परवडेल?

हळूहळू मी या मतापर्यंत येऊन पोचलीये की समाज म्हणून आपला ह्रास गेल्या ६४ वर्षात खूप वेगाने झाला आहे. विकास, इंडिया शाइनिंग हे सारे फार पोकळ शब्द आहेत, त्यातून लौकिक अर्थाने आपण काही  थोडंफार मिळवलंही असेल पण मूल्यं मात्र आपण गमावली आहेत. तक्रार घेऊन पोलीस चौकीत जा, छोट्या कामाकरिता सरकारी कार्यालयात जा, लाच न देता काम करून घेणे म्हणजे तो कपिलाषष्ठीचा योग असायला हवा. हे लाच मागणारे तुमच्या आमच्यापैकीच एक असतात. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जिथे लाच मागितली जाते, वारस म्हणून नाव लावून घेण्यासाठी जिथे लाच मागितली जाते, ती समाजातील कीड आहे. ती ही आंदोलनं करून संपणार नाही. घराघरातून समाजाच्या सर्व स्तरातून मुल्य संस्कारांची गरज आहे. या आंदोलानातून ते घडतील असं मला वाटत नाही.  फक्त उपदेशातून समाजाची मूल्य बदलणार नाहीत; जोपर्यंत आपल्या सर्वांना मुल्य शिक्षणाची गरज पटणार नाही तोपर्यंत काही मोठे बदल दिसणार नाहीत. मग या मूल्य शिक्षणाची सुरूवात माझयापासून, माझया घरापासूनच व्हायला नको का? पण ते हक्क मी तेन्व्हाच गमावले आहेत जेंव्हा मुलाचा जन्मतारखेचा दाखला मी लाच देऊन मिळवलाय, लाखभर रुपये जादा देऊन मी त्याला शाळेत घातलाय, मॅनेज्मेंट कोटयातून का होईना मी त्याला इंजिनियर वा डॉक्टर करायची स्वप्ने पाहतोय; आणि ही सारी माझी गुंतवणूक तो दाम दुपटीने तो वसूल करेल या आशेवर.

सगळ्यांना माहीत असतं ना कायदा नावाची एक गोष्ट आहे ते....तरीही गुन्हे घडतातच, कारण आपला बेकायदेशीर गोष्टींवरचा विश्वास खूप दृढ होत चाललाय. भक्कम कायदा सुव्यवस्था निर्माण करणं हा उपाय होईल, आंदोलनं करून काय होईल? तत्कलीक मागण्या मान्य करून घेणे हा जर त्यामागचा हेतू असेल तर ती एक फार्स ठरतील, आणि मूलभूत व्यवस्थेत बदल घडवून आणणे हा हेतू असेल तर सर्वस्तरीय, सर्व विचारधारांची गुंफण असणारे, दूरगामी परिणाम करणारे कार्य हाती घेण्याची गरज आहे.

Thursday, August 18, 2011

गुलज़ार- Celebrating his 75th Birthday today!

Gulzar.....the legend celebrating his 75 birthday today. I always wonder how a versatile person can be....! He is a poet, a lyricist, a director. He is comfortable in making strokes on a larger canvas where its Anand, Machis, Gharonda, Ijjajat, masoom, and other side bunty bubbli, sathiya, 7 khoon maaf. One side songs from Aandhi, guddi, Parichay, bandini, lekin and other side total filmy like Raavan, Omkara, veer, kaminey....


He is great. Essence of life in few and simple words. Sharing one of my favorite from the great poet. 



ek puraanaa mausam lauTaa yaad bharii puravaa_ii bhii
aisaa to kam hii hotaa hai vo bhii ho tanahaa_ii bhii

yaado.n kii bauchhaaro.n se jab palake.n bhiigane lagatii hai.n
kitanii sau.Ndhii lagatii hai tab maa.Njhii kii rusavaa_ii bhii

do do shaqle.n dikhatii hai.n is bahake se aa_iine me.n
mere saath chalaa aayaa hai aap kaa il saudaa_ii bhii

Khaamoshii kaa haasil bhii ik lambii sii Khaamoshii hai
un kii baat sunii bhii hamane apanii baat sunaa_ii bhii

Thursday, August 11, 2011

Poet Borkar Speaking

बोरकरांजवळ कवितेची एक मस्ती होती....अवधूती मस्ती...त्यांच्या चिरतारुण्याचा रहस्य त्यांच्या या मस्तीत होतंगोव्याच्या लॅटिन संस्कृतीचा मन्मुक्त संस्कार त्यांच्यावर होता हे तर खरच....पण त्यांच्या तरुणपणाला फुलवणारी पहिली घटनाच मोठी गोड आणि आठवणींनी हृदयात कळ उठवणारी होती.
शाळेत शिकत असताना एकदा जिन्यावरून खाली येणार्या बोरकरांचे डोळे एका मुलीने झाकले आणि त्यांचा गालावर ओठ टेकवून ती पळून गेली....:) बोरकर मात्र त्या क्षणी जे झिणझिणलेते आयुष्याचा अखेरपर्यंत झिणझिणतच राहीलेस्त्री ही त्यांच्यासाठी नेहमीच एक प्रेरक शक्ति बनून राहिली...एक विलक्षण गूढ आकर्षण बनून राहिली....

Tav nayananche dal halale ga
panavarachya davbindupari
tribhuvan he dalmalale ga || Dhru ||

Taare galale, vaare dhalale
diggaj pachananase valale
giri dhasalale sur kosalale
hrushi, muni, yogi chalale ga || 1 ||

Hrutuchakrache aas udale
abhalatun shabd nighale
aavar aavar apule bhaale
meen jali talamalale ga || 2 ||

Hrudayi majhya chakmak jhadali
najar tujhi dharanila bhidali
do hrudayachi kimaya ghadali
punarapi jag saavarale ga || 3 ||

Saturday, August 6, 2011

मैत्री म्हणजे असतं तरी काय?..


मैत्री म्हणजे असतं तरी काय?.......
मैत्री म्हणजे निरभ्र आभाळ, मैत्री म्हणजे अथांग समुद्र, मैत्री म्हणजे श्रावणसर, मैत्री म्हणजे टिपूर चांदणं, मैत्री म्हणजे परिजातकाचा सडा, मोगर्‍याचा दरवळ, मनी उमटणारी लकेर,
एकमेकांच्या साथीने समृद्ध होत जाणं हीच तर मैत्री ! आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट. सोबत नसताही आपण सोबतच असतो, अनेकदा शब्दांविनाही मनं ओळखता येतात, कोणीतरी आपलं ही भावना मैत्रीतूनच येते, आणि ती खूप सुखावणारी असते.